Tuesday, October 18, 2011

आवाज भारत मातेचा.....

आवाज भारत मातेचा.....

लाख प्राण मेले चालतील
पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे,
अनेक दिवस बकरी होउन जगण्या पेक्षा
माणूस एक दिवस वाघ होउन जगला पाहिजे.....

टाकली आज आपण मान
आली आज भारतावर वेळ,
लपेचुपे युद्ध करुनी
पाकिस्तान खेळतोय रक्ताचा खेळ.....

नको आम्हास लाचार मंत्री
मृतांची नको हाय पाहिजे,
आज आपल्या भारत देशास,
कडाडणारा शिवराज पाहिजे.....

अनेक देश करतात आपल्याशी मैत्री
कधी खुपसतात पाठीत सुरा,
शिवराज आम्हास सांगुन गेलेत
दुश्मनास तिथेच मातीत पूरा.....

नको आम्हास दुर्बळ वृती
नेता असा कनखर पाहिजे,
सदैव झडून विजय मिळवणारे
डॉ. बाबा साहेब आंबेडकर पाहिजे.....

कधी कश्मीर तर कधी मुंबई
रक्तात निघतोय न्हाउनी देश,
पकिस्तान करतोय भारतावर वार
दहशत वाद्याचा घालुनी वेश.....

आपल्या देशास आवाज उठवनारी
नविन पिठीची हाक पाहिजे,
देशासाठी सदैव लढ़णारे
अनेक तरुण भगतसिंह पाहिजे.....

                           कमलेश प्रल्हाद गुंजाळ

0 comments:

Post a Comment